Navi-Umed

Slide Slide Slide Slide चांगलं घडवू, शेअर करू!

नवी उमेद

समाजमाध्यमांमध्ये चालणारं तू-तू-मैं-मैं टाळून समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना लोकांपर्यंत पोचवणारा मंच, नवी उमेद.

आपल्या नजरेला बर्‍याचदा वाईटच पटकन दिसतं. कमतरताच लक्षात येतात. पण, नवी उमेद शोधून, निवडून चांगल्या सकारात्मक गोष्टी, आणि चांगली कामं घडवणारी माणसं लोकांसमोर आणण्याचं काम करतं. महाराष्ट्रकेंद्री असणं ही २०१६ मध्ये सुरू झालेल्या नवी उमेदची ओळख. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या, छोट्यातल्या छोट्या गावातल्या गोष्टी इथे वाचायला मिळतात. सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी सांगणारा हा मंच, नवी उमेद. चांगलं काही घडू शकतं, घडवता येतं याबद्दल लोकांचा विश्वास वाढवणारा, मनामनात उमेद जागवणारा मंच.

Navi Umed, the social media platform created by Sampark in the year 2016, brings the neglected change-makers from the small towns and villages of Maharashtra into the mainstream. Navi Umed finds and promotes extraordinary activities being done by otherwise ordinary people. Against the trolling and negativity that are commonly seen on social media, Navi Umed’s stories offer a ray of hope that good deeds are still being done in our society. Read more about our mission

|| शिक्षकदिन विशेष ||आनंददायी शिक्षण- सुप्रिया श्रीमाळीसहशिक्षिका, जि.प. शाळा, मिरखेल ता. परभणी"वा खूप छान, मस्तच....हे कौतुकाचे बोल मुलांसाठी होतेच पण ते माझ्यासाठी प्रेरणा होते. 14 नोव्हेंबरचं सुजाताचं भाषण असो, सांस्कृतिक कार्यक्रमात समर्थचा अभिनय असो, की वन्यजीव सप्ताहानिमित्त मुलांनी केलेल्या कविता, काढलेली सुंदर चित्रे. असे कितीतरी प्रसंग. मुलांच्या क्षमता ओळखून त्यांच्यासाठी योग्य ते उपक्रम राबवायचे. मग त्याची फलश्रुती मला पावलोपावली मिळत होती. माझा लाजरा-बुजरा वर्ग बोलका अन् आत्मविश्वासाने उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या प्रयत्नांना माझ्या उपक्रमांची जोड."कोविडनंतर तिसरीतून लगेच सहावीत प्रवेश केला हा वर्ग..कोरोनामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे वेली यांनी मुक्त श्वास घेतला पण त्याच काळात उमलणारे आमचे विद्यार्थी त्यांचा घडण्याचा श्वास घुसमटला. ऑनलाईन शिक्षण शहरात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाले.पण काही दिवसांंनी त्या ऑनलाइन शिक्षणाचे म्हणजेच मोबाईलचे दुष्परिणाम नजरेसमोर येऊ लागले आणि पालकांसह मुलंही कोरोनाचा राक्षस केव्हा निघून जाईल याची वाट पाहू लागले. त्याहीपेक्षा जास्त काळजी आम्हा शिक्षकांना, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतंय हे बघवत नव्हते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी गटकार्य, ऑनलाईन यासाठी ग्रामीण भागात प्रचंड अडचणी होत्या. गटकार्य, गट अभ्यास, गृहभेटी यात खूप कमी प्रतिसाद कारण पालकांना आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेची काळजी यासाठी पालक वर्ग धास्तावलेला होता. शेवटी शास्त्रज्ञांना लस शोधण्यात यश आले. दोन वर्षानंतर बावीस-तेवीस हे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू झालं. माझ्याकडे आलेला तिसरीचा वर्ग आधीच अध्ययन अक्षम म्हणून ओळखला जायचा.पण त्यात हे कोविडचे दोन वर्ष त्यानंतर तिसरीतून सहावीत आलेली बॅच त्यांच्यावर खूप मेहनत घ्यावी लागणार हे निश्चितच होते आणि मुलांंसाठी कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमीच तत्पर असणारे आम्ही शिक्षक.पहिले आव्हान होते शंभर टक्के उपस्थिती. 25%अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या गृहभेटी झाल्या. दूरध्वनीवरून संवाद, संपर्क सुरू करून उपस्थिती वाढवली. सुरुवातीचे आठ दिवस त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना जाणून घेत,गोष्टी गाणी चित्रकला याद्वारे शाळेची ओढ वाढवली. त्यांना बोलकं करण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यानंतर मुलांच्या क्षमता प्रत्यक्ष आजमावण्यासाठी सामान्य ज्ञानाची सोपी प्रश्नावली, भाषा, संख्याज्ञान, इंग्रजी यात कुठपर्यंत आहेत याचा शोध घेतला गेला. सामान्य ज्ञानाच्या दहापैकी फक्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर 58%आलं. प्रश्न होता आपण कोणत्या देशात राहतो? बाकीचे प्रश्नही असेच साधे सोपे पण 20%च्या वर टक्केवारी आली नाही. भाषेमध्ये वाक्यावर शून्य टक्के, जोड शब्दांवर 50% आणि मुळाक्षरावर 50%अशी अवस्था होती. इंग्रजीमध्ये18% मुले सेन्टेन्सवर तर 27% वर्ड्स वर, बाकीचे एबीसीडी पासून तयारी, गणितात भागाकार 36%, गुणाकार 13%वर तर उरलेल्या बाकीच्यांंची पाढ्यापासून तयारी.. ही टक्केवारी पाहून मला नवल वाटलंं नाही. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी हे.. कष्टकरी पालकांची मुलं फक्त शाळेत शैक्षणिक वातावरणावर अवलंबून असलेली. कितीशी तग धरणार? कुठल्याही आव्हानाला तयार असलेला शिक्षक हा मुलांसाठी तर सज्ज होता.वर्गामध्ये सर्वप्रथम 'ण' आकाराची बैठक व्यवस्था केली. प्रत्येक बाकावर मदतीची गरज असणार्‍या विद्यार्थ्याजवळ अध्ययनात बर्‍यापैकी सक्षम असलेला.अशा जोड्या बसवल्या. अशा वर्ग रचनेचा खूप चांगला परिणाम वर्ष अखेर दिसून येतो हा नेहमीचा अनुभव. मुले एकमेकांचा वाण नाही पण गुण नक्कीच घेतात. प्रत्येकाने एकमेकांच्या चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या हे सांगितलेलंं.त्यानंतर वर्गात दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांचा वाढांंक काढला. बालकाच्या वाढ व विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जावे. आणि मुलांनी सुद्धा आपल्या शारीरिक गरजांबद्दल जागृत व्हावे यासाठी, कारण प्रत्येक बालक शिकला पाहिजे. स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे,म्हणून शिक्षक पालकांच्या सहकार्याने बालकाच्या सर्वांगीण प्रगतीच्या लक्ष्याकडे वाटचाल व्हावी, कारण भविष्यात येणार्‍या सर्व समस्या ह्या वाढ व विकास या संबंधात असतातच. जसे अध्ययन अध्यापन करत असताना आकलन होणे, व्यक्त होणे,विचार मांडणे, उत्साह, सभाधीटपणा,ई.. कोणत्या विद्यार्थ्यात कितपत आहे हे शिक्षकांच्या लक्षात येतं.सर्वांच्या प्रगतीचे गमक योग्य पोषणात दडलेल आहे. म्हणून ’वाढांक’ काढला, विद्यार्थ्यांचे स्तर लक्षात घेण्यासाठी. परभणीच्या कृषी विद्यापीठातील बाल मानसशास्त्रज्ञ प्राध्यापिका विशाला पटनम मॅडम यांनी संशोधन करून बालकांच्या वाढ व विकास जाणणारे सूत्र वापरले. त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांपैकी ’अति उत्कृष्ट’ मध्ये शून्य.तर ’उत्कृष्ट’ स्तरावर आठ.’चांगले’ स्तरावर पाच.तर ’साधारण’ सहा. काळजीची गरज असलेले 2 तर तर एक अत्यंत काळजीची गरज असलेला. असा हा वर्ग तेव्हा मुलांना आहार आणि वाढ विकास याबद्दलच्या दोन तासिका घेतल्या आणि आपण वाढांकाच्या कोणत्या स्तरात आहोत. हे मुलांच्या लक्षात आणून दिले. उत्कृष्ट आणि अति उत्कृष्ट स्तरापर्यंत आपणाला पोहोचायचे आहे, ही प्रेरणा दिली,आणि आहाराविषयी वर्गात सांगितलेल्या गोष्टी पालकांनाही सांगायला सांगितल्या. तसेच अंगणवाडी ताई यांच्यातर्फेही आहार आणि वाढ यांच्या विषयीची मार्गदर्शन मुलांना उपलब्ध करून दिले.मुलांशी संवाद साधत असताना असे लक्षात आले,की 22 पैकी16मुले शाळेला येताना केवळ चहा-पाव, चहा-बिस्कीट खाऊन येतात.तर दूध घेणारे फक्त सहा.तर नियमित नाष्टा करणारे सहा.तसेच फक्त दोन वेळा जेवण करणारे 10.तर तीन वेळा जेवण करणारे नऊ.आणि असेही विद्यार्थी आढळले,की जे एक वेळा जेवण करतात,असे दोघे.यावर उपाय म्हणून उपक्रम राबवला तो म्हणजे ’अंगत-पंगत.’ तसेच शाळेत येताना सर्वांनी नाष्टा करून आलच पाहिजे.. डब्यात भाजी पोळी,भाकरी असली पाहिजे.अशा सूचना मुलांसोबत पालकांनाही सांगितल्या.गावामध्ये जेव्हा बचतगटांचा महिलांचा मेळावा होतो, तिथेही गावातील मातापालक यांच्याशी आहाराच्या बाबतीत संवाद होतोच. मुलांसोबत बसून अंगत-पंगत आम्ही वर्गात करू लागलो.त्यामुळे सर्वच विद्यार्थी डब्बा आणून शाळेत मिळणार्‍या खिचडी सोबत जेवत होते.त्यामुळे मुलांच्या आहारात सर्व घटक येऊ लागले.आवडी निवडी सोडून मुले असेल ती भाजी खाण्यास शिकले.अशाप्रकारे आमच्या सत्राची सुरुवात झाली. वर्गावरील भिंतीवर संतुलित आहार पिरॅमिड तयार करण्यात आला. आहारामध्ये प्रत्येक घटक किती प्रमाणात लागणार याची कल्पना मुलांना आली. येता जाता नजरेसमोर तो असल्या मुळे मुलांना शरीराच्या गरजा आणि विटामिन कार्बोहायड्रेट्स प्रथिने जीवनसत्वे यांची समज पक्की होण्यास मदत झाली. वर्गात अध्ययन अध्यापन करत असताना त्यांच्या क्षमतेनुसार तीन गट केले.पहिले दोन गट आणि प्रत्यक्ष वैयक्तिक लक्ष देण्यासाठी असलेला तिसरा गट अध्ययन अध्यापन करताना शिक्षक शिकवत असताना सर्व वर्गणी लक्ष द्यायचं आणि लेखी काम असेल तेव्हा पहिल्या दोन गटांनी मिळून ते करायचे त्याचवेळी मी तिसर्‍या गटाला जवळ घेऊन त्यांची मुळाक्षरे काना मात्रा जोडशब्द वाचन यांचा सराव घ्यायचा त्यासाठी शब्द पट्ट्या,चित्र कार्ड,भाषा पेटीचा वापर केला तसेच मधल्या एक तासाच्या सुट्टीत पहिल्या अर्ध्या तासात जेवण करून,नंतरच्या अर्ध्या तासात तिसर्‍या गटातील मुलांना घेऊन फलकावर लिहिलेले शब्द वाचन,तसेच फलकावर सोपे श्रुतलेखन,बेरीज- वजाबाकी इत्यादीचा सराव घेऊ लागलो.तसेच मोठ्या टाईपची छोटी गोष्टीची पुस्तके ही समांतर वाचायला दिली.ह्या सगळ्या गोष्टी दिवाळीपर्यंत केल्या दिवाळीपर्यंत तिसर्‍या गटातील सात पैकी तीन मुली वाचन स्तरापर्यंत पोहोचल्या.हे सर्व करत असताना पालकांनाही मुलांचा घरी सराव घेण्यासाठी सुचवले होते.दिवाळीच्या सुट्टीमध्ये या सात मुलांना काही गोष्टींची पुस्तके आणि शब्द चार्ट दिले आणि त्यांना रोज वाचण्याचा सराव करायला सांगितले.तसेच त्यांचे पालक मोठे भावंड यांनाही बोलावून त्यांचा सराव घेण्यासाठी सांगितले. दुसरे सत्र सरता सरता माझी ही चौकडी वाचू लागली. सोपी गणिते सोपी इंग्रजी शब्द हे सुद्धा ती वाचू लागली..तिसरी नंतर थेट सहावी मध्ये आलेली ही मुलं बुजलेली त्यामुळे त्यांना बोलकं करणे यासाठी विशेष लक्ष दिले त्यासाठी विविध उपक्रम राबवले दर शनीवारी दप्तरावीना शाळा. मग त्यादिवशी विविध बैठे खेळ, इंग्रजी पेटी,मराठी पेटी,चिठ्ठी बोलते,चित्रकला शब्द भेंड्या, जिलेबी तसेच प्रवास वर्णन यात्रा,मामाचं गाव, आपला छंद याविषयी वर्णने घेतली जायची.मुलांनाही शनिवारची शाळा खूप आवडे. वर्गातील वर्ग नायक वर्ग नायिका ही मतदान पद्धतीने निवडली ज्यायोगे गुप्त मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे.मुलंही या मतदान पद्धतीत उत्साहाने सहभागी झाली.आणि एक वेगळ्या अनुभवाचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर विलसत होता. त्यानंतर आरोग्य प्रतिनिधी, क्रीडा प्रतिनिधी, ग्रंथालय प्रतिनिधी,वर्ग सजावट, इत्यादी विविध कामे सोपवली.जुलै महिन्यात बावीस मुलांच्या नावांच्या चिठ्ठ्या केल्या. सांस्कृतिक कार्यक्रम,जयंती पुण्यतिथी असेल तेव्हा भाषण करण्यासाठी तीन मुलं वर्गातून निवडली जायची तर ती मुलं या चिठ्ठ्यातूनच निवडली जायची मग चिट्ठी कोणाचीही निघो त्याने भाषण केलेच पाहिजे. मुलांची क्षमता पाहून मी त्यांना सोपी भाषणे लिहून द्यायची. आणि प्रत्येकाला हा विश्वास दिला की तुम्हाला येतंच.फक्त थोडा प्रयत्न करायची गरज आहे. कोविड नंतरच्या काळात मुलांना भावनिक आधाराची प्रेरणेची खूप गरज होती. तसेच विश्वास दाखवण्याची की तू करू शकतोस.तसं केल्यामुळे वर्गात बुजरी असलेली सुजाता, साक्षी, काशिनाथ यांनी छान अशी भाषणे काही जणांना खूप प्रयत्न करूनही भाषण करणे जमले नाही तेव्हा त्यांना सांगितलं की या पुढच्या वेळी मी यापेक्षाही चांगला प्रयत्न करेन असं बोलून स्टेजवरून परत यायचं. शिवराज मोतीराम या दोघांनी असाही प्रयत्न केला पण मला विश्वास आहे पुढे भविष्यात भाषणासाठी पुढे येतील.यांचेही कौतुक वाटले. तसेच वर्गातील कोणतेही काम असेल तर चिठ्ठी काढली जाई.चिट्ठी निघाल्यावर आपल्याला जबाबदारीने ती गोष्ट करायलाच लागते हे मुलांच्या लक्षात आले. 'हम किसीसे कम नही' या भावनेने मुलं प्रत्येक गोष्ट करायला लागली.शब्दांकन - बाळासाहेब काळे, परभणी ... See MoreSee Less
View on Facebook
Twitter feed is not available at the moment.

Causes

Technology

Read more

तंत्रज्ञान

Child Rights

Read more

बालहक्क

Environent

Read more

पर्यावरण

Women Empowerment

Read more

महिला सबलीकरण

Agriculture

Read more

शेती

Drought

Read more 

दुष्काळ

MENSTRUAL HYGIENE

Read more 

मेन्स्ट्रुअल हायजिन

Districts

News

333

जलपरिषदेमुळे सुटतोय पाणीप्रश्न

नाशिक जिल्ह्यातले पेठ, सुरगाणा,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,दिंडोरी तालुके. या तालुक्यामधल्या आदिवासी भागात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाची तीव्रता यंदा कमी भासेल, अशी आशा आहे. जलपरिषदेनं अवघ्या दोन महिन्यात २०५ बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.

३८ दिवसात १३२ बाधितांना पैसे न घेता सेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतल्या या आठवणींनी अक्षय अस्वस्थ होतो पण त्याच वेळी बरे झालेल्यांच्या नातलगांच्या शुभेच्छा आठवून त्याला समाधानही वाटतं. अक्षय नारळे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरचा. तो रुग्णवाहिका चालवतो.

हॉकीचं ग्राऊंड गाजवणारी भावना

हिंगोली जिल्ह्यातलं छोटंसं गाव, सेनगाव. इथं राहणारी भावना सतिशराव खाडे. भावनाला लहानपणापासून खेळाची आवड. हे लक्षात आलं तिच्या आजी सरोजिनीताई खाडे यांच्या. त्यांनी तिला क्रीडा क्षेत्रात पाठवायचं ठरवलं. भावनाने पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची परीक्षा सहजच उत्तीर्ण केली.

Youtube

आपल्या अवतीभवती चांगलं घडतंय, लोक काही नवं घडवतायत, एनजीओ समस्यानिवारणात पुढाकार घेतायत, सरकारी व्यवस्था नोंद घेण्याजोगं काम करतेय, आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करतायत आणि यासारख्या अनेक सकारात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठीं आमच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या. इथले व्हिडीओ पाहून नवी उमेद जागेल, वाढेल. उमेद असली की पुन्हा चांगलं काही घडवायला, शेअर करायला हुरूप येईल.

More Articles

7-1

चला, ‘जांभूळबेट’ बघायला

जिल्हा परभणी. इथल्या पालम आणि पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीत मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असं जांभूळबेट आहे. बेटावर जायचं तर होडी गरजेचीच.

महिला सुरक्षेसाठी अंकिताने तयार केला सूट

वरवर पाहता हा नेहमीसारखाच कोट, जॅकेट वाटते. पण त्याला जोड आहे, तंत्रज्ञानाची ! त्यामुळे हा सूट घातलेली महिला सुरक्षित राहू शकते. हा सूट तयार केला आहे अंकिता रोटे या मुलीनं.
अंकिता सोलापूरमधल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातली. सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकत आहे.

संवादाचा मास्क

गेल्या वर्षभरापासून बाहेर जाताना नाका-तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, हे आपल्या सर्वांना कळलं आहेच. पण मास्कच्या वापरामुळं आपल्या सभोवतालच्या काही व्यक्तींना संवाद साधण्यात, समजून घेण्यात अडचणी येत आहेत. कर्ण आणि मूकबधीर व्यक्ती समोरच्याचं बोलणं समजून घेण्याकरता ओठांच्या हालचाली वाचत असतात. पण मास्कमुळे या संवादात अडथळे येतात.

वनसंवर्धनात महिला आणि शाळकरी मुलांचा सहभाग वाढविणाऱ्या भारतीताई

अत्यंत आखीव रेखीव, स्वच्छ अश्या हिरवळीने नटलेल्या बंधारपाड्याच्या रोपवाटिकेची जबाबदारी भारती सयाईस यांच्या खांद्यावर आहे. या रोपवाटिकेत उभारण्यात आलेले रोपवन हे भारतीताईंच्या कामाची चुणूक दाखवते. महिलांना आणि मुलांना निसर्ग सर्वधानांची गोडी निर्माण झाली पाहिजे या हेतूने भारती ताई यांनी तयार केलेलं रोपवन राज्यात आदर्श म्हणावं लागेल.

More Articles

पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे कामयाब!

‘पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे खराब!‘ अशी हिंदीमध्ये एक प्रचलित म्हण आहे. यावर बऱ्याच पालकांचा कळत नकळत विश्वास असतो. त्यामुळेच खेळात मुलांचा वेळ वाया जातो असं मानणारे पालक आपल्या आसपास पाहायला मिळतात. मग ‘खेळ’ ही व्यक्तिमत्व विकास आणि स्त्री सक्षमीकरणाची पहिली पायरी मानणे म्हणजे ‘मृगजळामागे धावणे’च नाही का? हा समज खोडून काढला तो माया पवार या शिक्षिकेने. कसा? वाचा तर मग.

ज्या शाळेत कुंभार सर, तिथला सूचनाफलक होतो विद्यार्थीप्रिय

प्रत्येक शाळेमध्ये एक सूचना फलक असतो.  तिथे विद्यार्थ्यांना सूचना देणार्‍या कागदांची गर्दी असते, मात्र डॉ. सुधीर कुंभार ज्या शाळेत शिक्षक म्हणून येतात, त्या शाळेतील सूचना फलक वाचायला विद्यार्थ्यांची गर्दी असते. या फलकांवर दर आठवड्याला असतात सरांनी केलेली नवी भित्तिपत्रकं.  नाव-‘निसर्गज्ञान’.  दर आठवड्याला लागणाऱ्या या भित्तिपत्रकांची संख्या लवकरच १ हजारवर पोहोचणार असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं या उपक्रमाची यापूर्वीच दखल घेतली आहे.

सेवाभावी पुंडलिक

‘ते’ पोलीससेवेत, 26-11 च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे त्यांचे वरिष्ठ, त्यांची शिकवण लक्षात ठेऊन वाटचाल करणे हे यांचे धोरण, त्यातून वारांगनांच्या मुलांसाठी शाळा, व्यवसाय प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा, किन्नारांचे प्रबोधन, त्यांच्या प्रश्नांवर काम, दरवर्षी शहीद पोलिसांना मानवंदना म्हणून एचआयव्हीसह जगणाऱ्या जोडप्यांचे स्वखर्चाने विवाह अशी यांच्या कामांची न संपणारी यादी.

ताप येण्याची कारणे आणि निदान

मलेरिया: प्लाझमोडियम ह्या एकपेशीय सजीवामुळे हा रोग होतो. हे जीव ऍनाफेलीस ह्या डासाच्या मादीच्या लाळ ग्रंथीत वाढतात आणि तिथे साठून राहतात. जेव्हा ती माणसाला चावते तेव्हा हे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात. ते तांबड्या पेशींमध्ये शिरतात आणि हळूहळू वाढू लागतात. त्यांच्यापासून स्त्री आणि पुबीजे(गॅमेट्स) तयार होतात.

Impact Posts

विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा: मलकापूर पॅटर्न
बाबाचं मनोगत: राम जगताप, संपादक, http://www.aksharnama.com
उमेद अपडेट
सामान्य माणूस ते असामान्य माणूस असा प्रवास घडला तो केवळ नवी उमेदमुळे
शाळेतील मुलींना पाच रूपयात सॅनेटरी नॅपकीन देणार - पंकजा मुंडे