









नवी उमेद
समाजमाध्यमांमध्ये चालणारं तू-तू-मैं-मैं टाळून समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना लोकांपर्यंत पोचवणारा मंच, नवी उमेद.
आपल्या नजरेला बर्याचदा वाईटच पटकन दिसतं. कमतरताच लक्षात येतात. पण, नवी उमेद शोधून, निवडून चांगल्या सकारात्मक गोष्टी, आणि चांगली कामं घडवणारी माणसं लोकांसमोर आणण्याचं काम करतं. महाराष्ट्रकेंद्री असणं ही २०१६ मध्ये सुरू झालेल्या नवी उमेदची ओळख. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या, छोट्यातल्या छोट्या गावातल्या गोष्टी इथे वाचायला मिळतात. सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी सांगणारा हा मंच, नवी उमेद. चांगलं काही घडू शकतं, घडवता येतं याबद्दल लोकांचा विश्वास वाढवणारा, मनामनात उमेद जागवणारा मंच.
Navi Umed, the social media platform created by Sampark in the year 2016, brings the neglected change-makers from the small towns and villages of Maharashtra into the mainstream. Navi Umed finds and promotes extraordinary activities being done by otherwise ordinary people. Against the trolling and negativity that are commonly seen on social media, Navi Umed’s stories offer a ray of hope that good deeds are still being done in our society. Read more about our mission
Causes
Districts
News

जलपरिषदेमुळे सुटतोय पाणीप्रश्न
नाशिक जिल्ह्यातले पेठ, सुरगाणा,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,दिंडोरी तालुके. या तालुक्यामधल्या आदिवासी भागात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाची तीव्रता यंदा कमी भासेल, अशी आशा आहे. जलपरिषदेनं अवघ्या दोन महिन्यात २०५ बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.

३८ दिवसात १३२ बाधितांना पैसे न घेता सेवा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतल्या या आठवणींनी अक्षय अस्वस्थ होतो पण त्याच वेळी बरे झालेल्यांच्या नातलगांच्या शुभेच्छा आठवून त्याला समाधानही वाटतं. अक्षय नारळे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरचा. तो रुग्णवाहिका चालवतो.

हॉकीचं ग्राऊंड गाजवणारी भावना
हिंगोली जिल्ह्यातलं छोटंसं गाव, सेनगाव. इथं राहणारी भावना सतिशराव खाडे. भावनाला लहानपणापासून खेळाची आवड. हे लक्षात आलं तिच्या आजी सरोजिनीताई खाडे यांच्या. त्यांनी तिला क्रीडा क्षेत्रात पाठवायचं ठरवलं. भावनाने पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची परीक्षा सहजच उत्तीर्ण केली.
Youtube
आपल्या अवतीभवती चांगलं घडतंय, लोक काही नवं घडवतायत, एनजीओ समस्यानिवारणात पुढाकार घेतायत, सरकारी व्यवस्था नोंद घेण्याजोगं काम करतेय, आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करतायत आणि यासारख्या अनेक सकारात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठीं आमच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या. इथले व्हिडीओ पाहून नवी उमेद जागेल, वाढेल. उमेद असली की पुन्हा चांगलं काही घडवायला, शेअर करायला हुरूप येईल.
More Articles

चला, ‘जांभूळबेट’ बघायला
जिल्हा परभणी. इथल्या पालम आणि पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीत मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असं जांभूळबेट आहे. बेटावर जायचं तर होडी गरजेचीच.
महिला सुरक्षेसाठी अंकिताने तयार केला सूट
वरवर पाहता हा नेहमीसारखाच कोट, जॅकेट वाटते. पण त्याला जोड आहे, तंत्रज्ञानाची ! त्यामुळे हा सूट घातलेली महिला सुरक्षित राहू शकते. हा सूट तयार केला आहे अंकिता रोटे या मुलीनं.
अंकिता सोलापूरमधल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातली. सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात शिकत आहे.
संवादाचा मास्क
गेल्या वर्षभरापासून बाहेर जाताना नाका-तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, हे आपल्या सर्वांना कळलं आहेच. पण मास्कच्या वापरामुळं आपल्या सभोवतालच्या काही व्यक्तींना संवाद साधण्यात, समजून घेण्यात अडचणी येत आहेत. कर्ण आणि मूकबधीर व्यक्ती समोरच्याचं बोलणं समजून घेण्याकरता ओठांच्या हालचाली वाचत असतात. पण मास्कमुळे या संवादात अडथळे येतात.
वनसंवर्धनात महिला आणि शाळकरी मुलांचा सहभाग वाढविणाऱ्या भारतीताई
अत्यंत आखीव रेखीव, स्वच्छ अश्या हिरवळीने नटलेल्या बंधारपाड्याच्या रोपवाटिकेची जबाबदारी भारती सयाईस यांच्या खांद्यावर आहे. या रोपवाटिकेत उभारण्यात आलेले रोपवन हे भारतीताईंच्या कामाची चुणूक दाखवते. महिलांना आणि मुलांना निसर्ग सर्वधानांची गोडी निर्माण झाली पाहिजे या हेतूने भारती ताई यांनी तयार केलेलं रोपवन राज्यात आदर्श म्हणावं लागेल.
More Articles
पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे कामयाब!
‘पढेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, खेलेंगे कुंदेंगे तो बनेंगे खराब!‘ अशी हिंदीमध्ये एक प्रचलित म्हण आहे. यावर बऱ्याच पालकांचा कळत नकळत विश्वास असतो. त्यामुळेच खेळात मुलांचा वेळ वाया जातो असं मानणारे पालक आपल्या आसपास पाहायला मिळतात. मग ‘खेळ’ ही व्यक्तिमत्व विकास आणि स्त्री सक्षमीकरणाची पहिली पायरी मानणे म्हणजे ‘मृगजळामागे धावणे’च नाही का? हा समज खोडून काढला तो माया पवार या शिक्षिकेने. कसा? वाचा तर मग.
ज्या शाळेत कुंभार सर, तिथला सूचनाफलक होतो विद्यार्थीप्रिय
प्रत्येक शाळेमध्ये एक सूचना फलक असतो. तिथे विद्यार्थ्यांना सूचना देणार्या कागदांची गर्दी असते, मात्र डॉ. सुधीर कुंभार ज्या शाळेत शिक्षक म्हणून येतात, त्या शाळेतील सूचना फलक वाचायला विद्यार्थ्यांची गर्दी असते. या फलकांवर दर आठवड्याला असतात सरांनी केलेली नवी भित्तिपत्रकं. नाव-‘निसर्गज्ञान’. दर आठवड्याला लागणाऱ्या या भित्तिपत्रकांची संख्या लवकरच १ हजारवर पोहोचणार असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं या उपक्रमाची यापूर्वीच दखल घेतली आहे.
‘ते’ पोलीससेवेत, 26-11 च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे त्यांचे वरिष्ठ, त्यांची शिकवण लक्षात ठेऊन वाटचाल करणे हे यांचे धोरण, त्यातून वारांगनांच्या मुलांसाठी शाळा, व्यवसाय प्रशिक्षण, जनजागृती कार्यशाळा, किन्नारांचे प्रबोधन, त्यांच्या प्रश्नांवर काम, दरवर्षी शहीद पोलिसांना मानवंदना म्हणून एचआयव्हीसह जगणाऱ्या जोडप्यांचे स्वखर्चाने विवाह अशी यांच्या कामांची न संपणारी यादी.
मलेरिया: प्लाझमोडियम ह्या एकपेशीय सजीवामुळे हा रोग होतो. हे जीव ऍनाफेलीस ह्या डासाच्या मादीच्या लाळ ग्रंथीत वाढतात आणि तिथे साठून राहतात. जेव्हा ती माणसाला चावते तेव्हा हे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात. ते तांबड्या पेशींमध्ये शिरतात आणि हळूहळू वाढू लागतात. त्यांच्यापासून स्त्री आणि पुबीजे(गॅमेट्स) तयार होतात.
Impact Posts
