महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा जालना (महसूल विभाग औरंगाबाद): माविनि ०.६६३ मानवविकास स्थिती: अल्प
तक्ता १
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ ),
त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.
क्र | आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % | |
१ | अर्जुन खोतकर / शिवसेना /जालना | ६५ | २ | १ | ६ | ४ | १ | ० | ० | ७९ | |
२ | संतोष दानवे / भाजप / भोकरदन | ६१ | ३ | ३ | ५ | ६ | १ | ४ | १ | ८६ | |
३ | नारायण कुचे / भाजप /बदनापूर | १४ | १ | १ | १ | ० | १ | ० | ० | ७९ | |
४ | राजेश टोपे / राकॉं / घनसावंगी | १० | १ | ० | ० | ० | ० | ० | ० | ७९ | |
५ | बबन लोणीकर/भाजप/परतूर: मंत्री प्रश्न आणि उपस्थिती लागू नाही. | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ||
जालना जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | १५० | ७ | ५ | १२ | १० | ३ | ४ | १ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण १५० प्रश्न विचारले गेले.
- आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्वाधिक ६५ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांत पाण्याविषयी ६ आणि शेतीविषयी ४ हे सर्वाधिक प्रश्नही त्यांनीच विचारले. त्यांनी उपस्थित केलेल्या अन्य प्रश्नांत २५ घोटाळे-गैरव्यवहारविषयक प्रश्नदेखील आहेत.
- त्या खालोखाल ६१ प्रश्न आमदार संतोष दानवे यांनी विचारले. त्यांनीच आरोग्यविषयक ३, शिक्षणविषयक ३ आणि बालकांविषयी ४ असे सर्वाधिक प्रश्न मांडले.
- धोरणविषयक १ प्रश्न आमदार राजेश टोपे यांनी विचारला. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलसंधारण आयुक्तालयाची निर्मिती करण्याविषयीचा हा २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात १४ डिसें रोजी विचारलेला तारांकित प्रश्न होता. सर्वात कमी प्रश्नही त्यांचेच.
- सर्वच आमदारांचे सामाजिक विषयांवरचे प्रश्न एक अंकी होते. महिलाविषयक फक्त १ प्रश्न उपस्थित गेला. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४० प्रश्न विचारले गेले.
- एकूण १५० पैकी ७ प्रश्न मुंबईबाबतचे होते.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: सौर पथदिवे उभारणी, शौचालय बांधकाम, रस्ते दुरुस्ती, बंधार्यांची कामे, सांबराची शिकार, नदीपात्रातील वाळूउपसा, लूटमारीच्या घटना, बंधार्याच्या दरवाजाची चोरी, निविदाफायली गहाळ होणे, वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार संतोष दानवे.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव/पक्ष/मतदारसंघ | भेटीसाठीसर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | जिल्ह्यातीलसंकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | अर्जुन खोतकर / शिवसेना /जालना | होय | होय | रेशीम खरेदी-विक्री केंद्र सुरु केले. |
२ | संतोष दानवे / भाजप / भोकरदन | होय | होय | मतदारसंघात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणत कामे केली. |
३ | नारायण कुचे / भाजप /बदनापूर | होय | होय | विशेष काही नाही |
४ | राजेश टोपे / राकॉं / घनसावंगी | होय | होय | साखर कारखाना, दूध डेअरी यांच्या माध्यमातून रोजगार दिला. |
५ | बबन लोणीकर / भाजप /परतूर: मंत्री | होय | होय | वॉटर ग्रीड योजना मंजूर केली. |
जिल्ह्यातील गाभ्याच्या समस्या
जिल्ह्यात पाणीप्रश्न सततचा आहे. त्यावर मात करण्यासाठी सातत्यपूर्ण व शाश्वत उपाययोजना आवश्यक आहे.