आमदारांची कामगिरी – धुळे जिल्हा

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

जिल्हा धुळे  (महसूल विभाग नाशिक) माविनि ०.६७१  मानवविकास स्थिती: अल्प

तक्ता १

आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८) त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
कुणाल पाटील कॉं/ धुळे ग्रा ८२ ११ ६६
अनिल गोटे/भाजप/धुळेशहर २६ ९५
धनाजी अहिरे /कॉं / साक्री २२ ८८
जयकुमार रावल /भाजप / सिंदखेडा / २०१६ पासून मंत्री १४ ८७
काशिराम पावरा/कॉं/ शिरपूर ८२
  धुळे जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न १४४ १३ ११  

 निरिक्षणे

  • जिल्ह्यातून एकूण १४४ प्रश्न विचारले गेले.  आमदार कुणाल पाटील  यांनी सर्वाधिक ८२ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांपैकी  शिक्षण, पाणी आणि शेती या विषयांवर अनुक्रमे ११, ७ आणि ९ असे प्रश्नही  फक्त त्यांनीच विचारले.
  • वरील वर्गवारीत जिल्ह्यातून सर्वाधिक मांडले गेलेले १३ प्रश्न शिक्षणविषयक होते. महिला आणि बालक या विषयांवर प्रत्येकी २ प्रश्न विचारले गेले.  धोरणविषयक प्रश्नही उपस्थित केले गेले नाहीत.
  • गैरव्यवहारविषयक एकूण २३ पैकी सर्वाधिक १२ प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी विचारले विचारले.   
  • आमदार काशिराम पावरा यांनी एकही प्रश्न विचारला नाही. 
  • नंदुरबार जिल्ह्यातल्या आमदारांनी स्वतःच्या जिल्ह्यातील समस्यांबद्दल प्रश्न विचारले नसले, तरी आमदार कुणाल पाटील, जयकुमार रावल आणि धनाजी अहिरे या तिघांनी त्यांच्या शेजारील नंदुरबार जिल्ह्याबद्दल प्रत्येकी एक प्रश्न विचारला आहे.
  • मुंबईचा उल्लेख ७ वेळा आला आहे. मुंबईतील जमिनीचे गैरव्यवहार, भूखंडांवरील अतिक्रमण, पोलीसदलाची फसवणूक अशा विषयांवरील प्रश्न आहेत.
  • वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे:  जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळे, जिप, महापालिकांमधला भ्रष्टाचार, जातपंचायतींचे निर्णय, तीर्थक्षेत्र परिसराचा विकास, शेतकर्‍यांचे नुकसान, अनुदान वगैरे.
  • सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार अनिल गोटे.

तक्ता २

आमदारांची मतदारसंघातील कामगिरी

(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरीक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश संकटप्रसंगी मदतीला धावणे गेल्या ५ वर्षांत केलेले नाव घेण्याजोगे  लोकहिताचे काम
कुणाल पाटील कॉं / धुळे ग्रामीण १ स्वीय सहायकामार्फत हो जलसिंचनाची कामे
अनिल गोटे  / भाजप / धुळे शहर १ सहज सहसा नाही धुळे शहारातील पांझरा नदीच्या दोन्ही काठाला लागून साडेपाच किलोमीटर लांबीचे रस्ते
जयकुमार रावल / भाजप / सिंदखेडा : मंत्री सहज हो सिंचनव्यवस्था बळकट केली, बुराई नदी बारमाही केली, दळणवळणाची साधने सक्षम केली. एमआयडीसी मजबूत केली. 
धनाजी अहिरे  / कॉं  / साक्री सहज सहसा नाही नाही
काशिराम पावरा / कॉ /  शिरपूर सहज सहसा नाही नाही

जिल्ह्यातील गाभ्याच्या सामाजिक समस्या (सरकारी माहितीअनुसार)

गरोदर मातांना मिळणारे लोह, फॉलिक अॅसिड यांचा अपुरा पुरवठा,  ६ ते ९ महिने वयाच्या मुलांना मिळणारा अपुरा आहार, अपुरे बाललसीकरण, जन्मावेळचे बाळाचे  कमी वजन, बालकांमधील ॲनिमिया,  प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीच्या वेळेची काळजी, जननी सुरक्षा योजनेचे लाभ न मिळणे, गर्भपात आणि मृतजन्म, स्त्री डॉक्टर्स आणि स्त्री शिक्षक यांचे अल्प प्रमाण, अतिरिक्त ANMयुक्त उपआरोग्यकेंद्रांची कमी संख्या, शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण एकूणपैकी अर्ध्यापेक्षा कमी, IHHL नसलेली टॉयलेट्स.