महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी
जिल्हा लातूर (महसूल विभाग औरंगाबाद): माविनि ०.६६३ मानवविकास स्थिती:अल्प
तक्ता १
आमदारांची अधिवेशनांतील उपस्थिती आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या.
माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८ )
त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे
क्र | आमदाराचे नाव, पक्ष / मतदारसंघ | एकूण प्रश्न | आरोग्य | शिक्षण | पाणी | शेती | बेरोजगारी | बालक | महिला | उपस्थितीची सरासरी % |
१ | अमित देशमुख / कॉं /लातूर शहर | ७४ | ११ | 8 | ७ | ९ | ० | ९ | १ | ७० |
२ | बसवराज पाटील /कॉं /औसा | ४६ | २ | २ | ३ | ० | ० | २ | ० | ८० |
३ | सुधाकर भालेराव /भाजप /उदगीर | ४१ | १ | ४ | ३ | ० | ० | २ | १ | ८८ |
४ | त्रिंबक भिसे/ कॉं /लातूर ग्रामीण | ४१ | १ | ३ | ६ | ३ | १ | २ | ० | ५७ |
५ | विनायक जाधव /अपक्ष/अहमदपूर | १९ | ० | १ | ० | १ | १ | २ | ० | ८७ |
६ | संभाजी पाटील निलंगेकर /भाजप /निलंगा: मंत्री. प्रश्न आणि उपस्थिती लागू नाही | |||||||||
लातूर जिल्ह्यातून विचारले गेलेले एकूण प्रश्न | २२१ | १५ | १८ | १९ | १३ | २ | १७ | २ |
निरिक्षणे
- जिल्ह्यातून एकूण २२१ प्रश्न विचारले गेले. आमदार अमित देशमुख यांनी सर्वाधिक ७४ प्रश्न विचारले. अभ्यासविषयांतील आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती आणि बालक यासंबंधी सर्वाधिक प्रश्न त्यांनीच विचारले.
- वरील वर्गवारीत, जिल्ह्यातून सर्वात जास्त १८ प्रश्न पाणीविषयक आणि सर्वात कमी प्रश्न बेरोजगारी आणि महिला या विषयांवर प्रत्येकी २ विचारले गेले. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण १४ प्रश्न उपस्थित केले गेले. धोरणविषयक एकही प्रश्न मांडला गेलेला नाही.
- सर्वात कमी प्रश्न आमदार विनायकराव जाधव यांनी उपस्थित केले. सर्व ५ आमदारांनी दोन अंकी प्रश्न विचारले. एक अंकी इतके कमी प्रश्न कोणाच्याही नावावर नाहीत.
- वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: लातूर जिपची बिकट आर्थिक स्थिती, जिल्हा पोलीसदलात भरती, पाणीटंचाई निवारण, वाळूउपसा, शेतकर्यांचे थकित अनुदान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीरक्कम मिळण्यास विलंब वगैरे.
- सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे – आमदार सुधाकर भालेराव.
तक्ता २
आमदारांची मतदारसंघातील कामगिरी
(संपर्क जिल्हा प्रतिनिधीची निरिक्षणे व त्याने जाणून घेतलेल्या नागरिकांच्या मतांवर आधारित)
क्र | आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ | भेटीसाठी सर्वसामान्यांना सुलभ प्रवेश | जिल्ह्यातील संकटप्रसंगी मदतीला धावणे | गेल्या ५ वर्षांत केलेले, नाव घेण्याजोगे लोकहिताचे काम |
१ | अमित देशमुख / कॉं /लातूर शहर | नाही | अपवादात्मक | विशेष असे नाही |
२ | बसवराज पाटील /कॉं /औसा | होय | होय | विशेष असे नाही |
३ | सुधाकर भालेराव /भाजप /उदगीर | होय | होय | विशेषअसे नाही |
४ | त्रिंबक भिसे/ कॉं /लातूर ग्रामीण | होय | होय | विशेष असे नाही |
५ | विनायक जाधव /अपक्ष/अहमदपूर | होय | होय | विशेष असे नाही |
६ | संभाजीपाटीलनिलंगेकर/भाजप/निलंगा: मंत्री | होय | होय | रेल्वे कोचची फॅक्टरी मंजूर करून घेतली. त्याचे कामही सुरू आहे. या व्यवसायामुळे हजारोंना रोजगार उपलब्ध होतील. |
निरिक्षणे
- उजनीच्या पाण्याचा रखडलेला प्रश्न
- रेल्वे बोगी निर्मिती प्रकल्पाला गती नाही
- माखनी योजना रखडलेली
- लातूर-बार्शी रस्त्याचे कामही अपुरे.